संध्याकाळ जवळ आली की माझं असं होतं
तुझी आठवण दाटून येते आणि मन पिसं होतं
माणसांमध्ये असुनसुध्दा मी अगदी एकटा असतो
अळवावरचा थेंब जसा त्यावर बसुन वेगळा असतो
मला व्याकूळलेला पाहून सुर्य क्षणभर रेगांळतो
इंद्रधनु होतो आणि सात रंगात ओघळतो
आभाळ झुकतं पश्चिमेला आणि थोडी कुदं हवा
वा-यावरती लहरत येतो तुझ्या आठवणींचा थवा
एकाएकी दरवळ उठतो रातराणी येते फुलुन
तु आता येते आहेस याची मला पटते खुण
पैजंणांची छमछम आणि कानामागे तुझे श्वास
चोहिकडे भरुन राहतात घमघमणारे तुझे भास
खरंच,
संध्याकाळ जवळ आली की माझं असं होतं
तुझी आठवण दाटून येते आणि मन पिसं होतं
Wednesday, August 22, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment